2021



शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यानी केले धर्मपरिवर्तन, केला हिंदू धर्माचा स्वीकार

गाझियाबादच्या डासना देवी मंदिरातील शिव शक्ती धामचे महंत यती नरसिम्हानंद गिरी महाराज यांनी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम यांना सनातन धर्मात सामिल करून घेतले.

रिझवी याचे नवीन नाव जितेंद्र नारायण त्यागी ?

वसीम रिझवी यांचे अद्याप नामांतर झालेले नाही. यती नरसिम्हानंद गिरी महाराज यांनी धार्मिक अनुष्ठाण करून त्यांना हिंदू धर्मात सामिल करून घेतले. रिझवी यांना त्यागी समुदायाशी जोडण्यात आले आहे. यानंतर जितेंद्र नारायण त्यागी असे नवीन नाव देण्यात आले आहे.

यावेळी ते म्हणाले “मृत्यू झाल्यानंतर माझा दफनविधी करू नका, तर हिंदू पद्धतीने अंत्यविधी करा. ” इस्लामचे पवित्र धर्मग्रंथ कुराणमध्ये बदल करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. तेव्हापासूनच मुस्लिम समुदायात ते टीकेचे केंद्र ठरत आहेत.


वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे काय? शेतीत त्याचा काय फायदा?


 

वनस्पती ऊती संवर्धन

वनस्पति आणि प्राण्याचे शरीर हे लाखों पेशीपासून बनलेले असते याची संरचना ही त्याचा कार्य करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणार्‍या पेशीसमूहाला ऊती म्हणतात. या वनस्पतीच्या काही ऊतीमध्ये पूर्ण वनस्पति तयार करण्याचे तंत्र असते याच ऊतीचे प्रयोगशाळेत कृत्रिम वातावरणामध्ये संवर्धन केले जाते आणि यापासून हजारो एकाच प्रकारचे वनस्पति तयार केले जाते.  

ऊती संवर्धनाचे फायदे:

  • या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळेत एकाच प्रकारच्या हजारो रोपाचे उत्पादन केले जाते.
  • ऊती संवर्धीत रोपे रोग मुक्त असतात. या तंत्रज्ञानाद्वारे रोग प्रतिरोधी, कीटक  प्रतिरोधी आणि दुष्काळ प्रतिरोधी वाणाचे  उत्पादन केले जाऊ शकते
  • संपूर्ण वर्षभर याचे उत्पादन केले जाऊ शकते, याच्यावर ऋतूचा काही परिणाम होत  नाही.
  • या तंत्रज्ञानापासून तयार रोपाची वाढ चांगली व लवकर होते. फलधारणा लवकर व एकदाच होते.
  • हे तंत्रज्ञान विषाणूमुक्त वाण तयार करण्यास खूप मदत करते.











जागतिक मृदा दिनाचे महत्त्व
 

माती हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. या मातीच्या संवर्धनाची असलेली गरज लक्षात घेऊन लोकानी जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी 5 डिसेंबर 'जागतिक मृदा दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षततेसाठी मृदेचं संवर्धन अत्यंत महत्तवाचे आहे. वाढती लोकसंख्या आणि जागीतिकरणाची स्पर्धा यामुळे भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी 800 ते 1000 वर्षांचा कालावधी लागतो.

मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केलं जातं. शेतकऱ्यांसोबतच सामान्य माणसांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याचा उद्देश त्यामागं आहे.

भारतातही मृदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. मृदेच्या संवर्धनासाठी भारत सरकारतर्फे 2015 साली सॉइल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मृदेचे स्वास्थ्य टिकवणे, शेतीच्या शाश्वत विकास करणे आणि त्याद्वारे अन्नसुरक्षा करणे हा उद्देश आहे.

मृदा प्रदूषण टाळायचं असेल तर काय करावं?
अलिकडे मोठ्या प्रमाणावर मृदेचं प्रदूषण होताना दिसतंय. ते टाळायचं असेल तर काही पाऊलं उचलली पाहिजेत. प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे. त्या ठिकाणी पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करायला हवा.आपल्या वाया जाणाऱ्या खाद्य पदार्थांचं रुपांतर कंपोस्ट खतात करायला हवं.

MKRdezign

Powered By Blogger
Powered By Blogger

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget